Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगारांना मिळणार 12 हजार रुपये पेंशन, अर्ज झाले सुरु

Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: ज्या कामगारांकडून काम होत नाही किंवा ते निवृत्त झाले आहेत, अशा कामगारांना आता राज्यसरकार पेन्शन सुद्धा लागू करणार आहे. ज्यामुळे कामगारांना वृद्धावस्ते मध्ये सुद्धा बाकीचे जीवन जगण्यास मोठी मदत होणार आहे. नेमकी हि पेन्शन योजना काय आहे, पेन्शन साठी कोण पात्र असेल, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघुयात.

Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra: कामगार पेंशन योजना संपूर्ण माहिती

हि योजना बांधकाम कामगार मंडळामार्फत राज्यभरातील वृद्ध इमारत बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी राबविण्याचा जी-आर कालची राज्यसरकारने सार्वजनिक केलेला आहे. हि योजना ज्या कामगारांचे वय हे 60 अधिक झाले आहे आणि त्यांनी किमान 10 वर्ष नोंदणीकृत कामगार म्हणून काम केले आहे, अशा नागरिकांसाठीच सुरु केली गेली आहे. Bandhkam Kamgar Pension Yojana अंतर्गत पात्र कामगाराला 12 हजार रुपये पेंशन दिली जाणार आहे. या योजनेमुळे लाखो वृद्ध, निवृत्त कामगारांच्या आर्थिक सबलीकरणाचा प्रश्न मगरी लागणार आहे.

योजनेचे उद्देश

जेव्हा ते कामगार कार्यरत होते तेव्हा त्यांना बांधकाम कामगार घरकुल योजना, विवाह योजना, होम लोन योजना सारख्या अनेक योजनांचा लाभ दिला जात होता. आता शासनाने नवीन उद्देश सामोरे ठेवले आहेत. निवृत्त झालेल्या कामगारांना आर्थिक मदत करून त्याच्ये जीवन सुधारणे. कामगारांना बाकीचे राहिलेले जीवन आनंदाने जगण्यासाठी मदत करणे. या वयामध्ये सुद्धा स्वावलंबी कामगार बनवणे जेणेकरून त्यांचे जीवन इतर कोणावर जास्त अवलंबून नसावे.

लाभाचे स्वरूप

लाभार्थ्यांना Bandhkam Kamgar Pension Yojana मार्फत 12 हजार रुपये पर्यंत वार्षिक पेन्शन दिली जाणार आहे. आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत 37 लाख हे नोंदणीकृत कामगार आहेत. त्यापैकी बरेचसे निवृत्त सुद्धा झलेले आहेत.

ज्या कामगारांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून 10 वर्ष काम केले आहे त्यांना 6000 रुपये वार्षिक पेन्शन, ज्या कामगारांनी 15 वर्ष काम केले त्यांना 9000 रुपये वार्षिक पेन्शन आणि ज्यांनी 20 वर्ष काम केले त्यांना वार्षिक 12000 हजार रुपये पेन्शन दिले जाणार असल्याची माहिती जी-आर मध्ये आहे. योजनेचा लाभ हा पती आणि पत्नी या दोघांना सुद्धा पात्र ठरल्यास मिळणार आहे.

योजनेचे पात्रता निकष

अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा स्थायिक रहिवासी असावा. तसेच तो कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणीकेलेला असणे आवश्यक आहे. अर्जदाराने किमान दहा वर्ष तरी नोंदणीकृत कामगार म्हणून काम केलेले असणे गरजेचे आहे. तसेच ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त असेल आणि ते निवृत्त झाले असेल अशाच कामगारांना योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेसाठी एक कुटुंबातील कितीही व्यक्ती पात्र ठरू शकतात. परंतु जर आधी पासून अर्जदार या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला अपात्र करण्यात येईल.

लागणारे आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखल/वयाचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • बँकेचे खातेबुक
  • पासपोर्ट फोटो

विशेष तरतूद

एक दाम्पत्यापैकी जर पतीचा मृत्यु झाला तर त्या वरची पेन्शन हि कामगाराच्या पत्नीला जिवंत असे पर्यंत देण्यात येईल. तसेच जर पत्नी चा मृत्यू झाला तर तिच्या वरची पेन्शन हि त्या महिलेच्या नवऱ्याला दिली जाणार आहे. जर साथीदार आदी इतर दुसऱ्या पेन्शनचा लाभ घेत असेल तर मात्र त्याला Bandhkam Kamgar Pension Yojana चा लाभ मिळणार नाही.

अर्ज पद्धती

ज्याप्रमाणे भांडी योजना साठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केला जातो, त्याच पद्धतीनं योजनेचा सुद्धा आपल्याला अर्ज करता येणार आहे. mahabocw.in या अधिकृत साइट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. कामगार कल्याण मंडळ च्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.

निष्कर्ष

या योजनेनंतर हे स्पष्ट होते कि, राज्यसरकार हे मुलांसोबत व विद्यार्थ्यांसोबत वृद्ध नागरिकांच्या सुद्धा हिताचे निर्णय घेत आहे. हि योजना खर्च वृद्ध बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आशेचा किरण बनला आहे. तुमच्या घरी सुद्धा कोणी योजनेच्या योग्य असेल, तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला व्हाट्स अँप ला जॉईन करा, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment