बेरोज़गारीची समस्या हि महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशात देखील खूप वाढलेली आहे. ते कमी करण्याकरिताच सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. त्यापैकीच एक Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra सरकार मार्फत देखील राबविण्यात येत आहे.
हि योजना वर्ष 2024 मध्ये महाराष्ट्र सरकार ने सुरु केली होती.ज्याचा लाभ घेयून अनेको तरुण एक चांगली नोकरी मिळवतील अथवा आर्थिक प्रबळ आणि सक्षम देखील होतील.
आपण या आर्टिकल मध्ये (Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra) मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र सरकारने कोणासाठी सुरु केली आहे? कोण या योजनेचा लाभ घेऊ शकेल? योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता निकष काय असेल? योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत? या सर्व प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत. ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
महत्वाचे बघा: Vidya Vetan Yojana Maharashtra: राज्यातील तरुणांना मिळणार प्रतिमाह 10,000/- रुपये, अर्ज झाले सुरु.
Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra Goverment- मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजना
महाराष्ट्रात 2024 मध्ये निवडणुकीला पुढे ठेऊन विविध योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. मग ते लाडकी बहीण योजना पासून लाडका भाऊ योजना ने मतदारांना खुश करण्यात आले आहे. त्याच प्रकारची एक योजना Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana देखील आहे. जी राज्यातील बेरोजगार युवकांसाठी खूप मोठी मदत प्राप्त झाली आहे. ज्यामुळे हजारो बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभामुळे खूप मदत होणारी आहे.
सरकार या योजने मार्फत जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत त्यांना प्रति महिना 5,000 रुपये प्रदान करणार आहे. आजकालच्या बेरोजगारीच्या परिस्थितीला आपणाला चांगलीच माहित असेल. सरकारी नोकरीच्या एका जागेसाठी राज्यातील लाखो युवक अर्ज करत असतात. ज्यातून स्पष्ट होते कि, राज्यातील बेरोजगारी किती मोठी समस्या बनलेली आहे.
काही युवक हे रात दिवस अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याकरिता अतोनात प्रयन्त करत असतात. त्यांना सरकारी नोकरी मिळवून स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती सुधारवायची असते. परंतु पैश्याच्या अभावामुळे किंवा गरिबीमुळं त्यांना फार मोठा संघास करावा लागत असतो. अश्या युवकांना मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजना फार मोठे वरदान बनत आहे.
महत्वाचे बघा: Bankam Kamgar Yojana। बांधकाम कामगार योजना। Online Apply 2025
मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेची वैशिष्ट
- Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra सरकार कडून सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणा साठी राबविण्यात येत आहे.
- जो हि युवक या योजनेच्या लाभाकरिता पात्र राहील त्याला 5,000 रुपये प्रति महिना नोकरी प्राप्त करेपर्यंत मदत म्हणून मिळणार आहे.
- हा बेरोजगारी भत्ता काही ठराविक कालावधीसाठीच राहणार आहे.
- सरकारच्या या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संघर्षाच्या काळात आर्थिक मदत होणार आहे.
बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र पात्रता निकष 2025
- Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार हा मुलाचा महारास्तरचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार हा पूर्णतः बेरोजगार असावा, अर्थात कुठल्याही सरकारी नोकरी, खाजगी नोकरी किंवा कुठल्याही व्यापाराशी जुडलेला नसावा.
- कुठल्याच माध्यमातून अर्जदार इनकम करत नसावा.
- योजनेचा लाभ फक्त 21 ते 35 वयोगटातीलच तरुण घेऊ शकतील.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपया पेक्षा जास्त असू नये.
- मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजना चा महारष्ट्रामधे लाभ घेण्याकरिता अर्जदार 12 वि पास असणे आवश्यक आहे.
- कमाल शिक्षण पदवी ज्यामध्ये BSC, BCOM, BA पर्यंत तरी असावे.
- अर्जदाराकडे कुठलीही नोकरी देणारा डिप्लोमा अथवा डिग्री नसावी.
बेरोजगार भत्ता योजना चा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
1. | आधार कार्ड |
2. | ओळखपत्र |
3. | रहिवासी दाखला |
4. | उत्पन्नाचा दाखला |
5. | जन्माचा दाखला |
6. | मार्कशीट |
7. | पासपोर्ट फोटो |
8. | मोबाईल नंबर |
मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजनाचे फायदे
- बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र सरकारने सुरु करून सर्व बेरोजगार तरुणासाठी एक मोठा मदतीचा हात पुढे केला आहे.
- ज्या मार्फत जो हि अर्जदार या योजनेसाठी पात्र लाभार्थी होईल त्याला प्रति महिना 5,000 रुपये महिना भत्ता सरकारद्वारे देण्यातयेणार आहे.
- Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana चा लाभ लाभार्थी ला कुठली हि नोकरी अथवा रोजगार मिळेपर्यन्त प्राप्त होणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना एक विकासाची दिशा मिळेल.
- मिळणाऱ्या भत्ता चा लाभार्थी त्याच्या जीवनातील आवश्यक गरजा आणि स्वतःचे जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा मार्ग बनेल. आणि त्यानं दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजना मार्फ़त लाभार्थी युवकाची थोडी आर्थिक स्थिती देखील सुधारेल.
बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील लाखो बेरोजगार युवक हे रोजगार मिळण्याच्या प्रतीक्षेत असतात तर काही सरकारी नोकरीच्या. काही युवक नोकरी मदत नाही म्हणून आत्महत्येचा देखील निर्णय घेतात. कारण बेरोजगारी आली तेथे गरिबी सुद्धा येतेच.
जिचा त्रास हा कुठल्या रोगापेक्षा कमी नाही आहे. अश्या गरीब व असहाय बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा उद्देश सरकारचा आहे. सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे युवकांना स्पर्धेच्या या युगात संघर्ष करण्याकरिता थोडी मदत आणि ऊर्जा मिळेल.
सोबतच ते चांगल्या प्रकारे स्वतःचे जीवन जगू शकतील व आपला रोजगार मिळवण्याचा संघर्ष सुरु ठेवू शकणार आहेत. सोबतच ते त्याच्या कुटुंबची सुद्धा काळजी घेऊ शकतील. बेरोजगारी भत्ता योजना मार्फत सरकार प्रति महिना 5,000 रुपये तोपर्यंत देणार आहे, जो पर्यंत तो युवक स्वतःचा व्यवसाय सुरु करत नाही किंवा चांगली नोकरी मिळवत नाही. त्यामुळे पात्र तरुणावर रोजगार मिळे पर्यंत आर्थिक ताण-तणाव येणार नाही आहे.
Mukhyamatri Berojgari Bhatta Yojana Maharastra Apply Online
जर तुम्ही सुद्धा बेरोजगार आहेत,आणि राज्य सरकारच्या बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर खाली सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब करून ऑनलाइन अर्ज करू शकता.
सर्वप्रथम राज्यसरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. तेथे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर टाकूण, तुमच्या आधारही संलग्न असलेल्या मोबाईल नामावर वर OTP येईल, तो तेथे टाकून तुमचा आदी आणि पासवर्ड बनवून घ्यावा लागणार आहे.
नंतर Mahaswayam या पोरातलं वर जाऊन लॉग इन करून योजनेचा अर्ज भरवा लागेल. अर्ज भारत असतांना आवश्यक माहिती व्यवस्थित पाने भरावी, चुकीची माहिती भरण्यात आली असता तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो. सर्व माहिती भरन झाल्यानंतर काही कागदपत्रे तेथेच अपलोड करायची आहेत.
नंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लीक करून अर्ज सबमिट करावा लागेल. अश्या अगदी सोप्या पद्धतीने तुमि बेरोजगारी भत्ता योजनांचा लाभ घेऊ शकता. योजनेसाठी तुम्ही पात्र झालेत तर तुम्हाला प्रति महिना 5,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील.
निष्कर्ष
बेरोजगार युवकांसाठी हि अतिशय महत्वाची आणि फायदेकारक योजना आहे. ज्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी योजना अर्ज करावा. जर आपल्या परिसरात कोणी बेरोजगार तरुण असतील त्यांना सुद्धा हि माहिती नक्की शेयर करा. तसेच योजनेचा अर्ज भारत असतांना काही अडचण अली असता आम्हाला नक्की सांगा, आम्ही तुमची मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.
योजनेचा अर्ज येथे करा | Open Now |
सरकारचा हेल्पलाईन नंबर | 022-22625651, 022-22625653 |
FAQs.
-
Que- महाराष्ट्रात बेरोजगारांसाठी काही योजना आहे का?
Ans: महाराष्ट्र सरकारने तरुण बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता योजना सुरु केली आहे. योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगार घेऊ शकतात.
-
Que- बेरोजगारी भत्ता कसा मिळेल?
Ans: बेरोजगारी भत्ता चा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम सरकारने जाहीर केलेल्या संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. जर आपण सर्व पात्रता निकषा मध्ये पात्र झालात तर तुमाला देखील ह्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल.
-
Que- सरकार बेरोजगारांना पैसे देते का ?
Ans: महाराष्ट्र सरकारने बेरोजगार युवकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक मुख्यमंत्री बेरोजगारी योजना देखील आहे. ज्याद्वारे सरकार बेरोजगारांना ५ ० ० ० रुपये प्रति माह देण्यात येईल.