Vidya Vetan Yojana Maharashtra 2025: संपूर्ण देशात तर बेरोजगारी तर आहेच, सोबत आपल्या महाराष्ट्रात देखील खूप सारे तरुण हे बेरोजगार आहेत. सध्या चपराशी पदाच्या जरी जागा निघाल्या तर त्या साठी देखील राज्यातील डिग्री घेणारे लाखो तरुण अर्ज करत असतात . यावरून आपण समजू शकतो कि, राज्यात रोजगाराची काय अवस्था झालेली आहे.
यावरच नियंत्रण आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे Vidya Vetan Yojana Maharashtra हि आहे. या योजनेचे मूळ नाव हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आहे. परंतु अधिक तर लोक या योजनेला विद्या वेतन योजना म्हणूंच ओळखतात.
या योजनेमार्फत सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रतिमाह 10,000/- रुपये मदत म्हणून देणार आहेत. याच्या सोबतच किमान सहा महिन्यासाठी ची एका खासगी कंपनी मध्ये अप्रेन्टिसशिप करण्यासाठी देखील प्लेसमेंट देणार आहेत. ज्यामध्ये तरुणांना कामाचे परिशक्षण दिले जाणार आहे. सोबतच सहा महिन्याचा अनुभव देखील त्यांना मिळणार आहे. ज्याचा फायदा तरुणांना रोजगार प्राप्त करण्याकरिता होणार आहे.
आज आपण या आर्टिकल मध्ये नेमकं विद्या वेतन योजना महाराष्ट्र काय आहे?, योजनेसाठी पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागतील? योजनेचे फायदे काय? आणि योजनेचा अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती बघणार आहोत.
महत्वाचे बघा: PM Mudra Yojana In Marathi: बिजनेससाठी मुद्रा योजना मार्फत मिळणार 20 लाखाचे कर्ज, हि लागणार कागदपत्रे
Vidya Vetan Yojana Maharashtra- विद्या वेतन योजनाची संपूर्ण माहिती
विद्या वेतन योजना उर्फ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हि तात्काकालीन महायुती सरकारने सुरु केली आहे. जी मागील वर्षी म्हणजेच 2024 पासून संपूर्ण राज्यभर राबविण्यास सुरुवात झाली आहे. वाढती बेरोजगारी ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या हाताला काम मिळत नाही आहे. सर्व तरुण आणि तारुंनींना सरकारी नोकरी मध्ये देखील सामावून घेणे शक्य नाही आहे.
या बेरोजगारीचला उपाय म्हणून सरकारने विद्या वेतन योजना महाराष्ट्र मध्ये नवीन पर्याय उभा केला आहे. या योजनेमार्फत पात्र तरुण/तरुणींना 6,000 ते 10,000/- रुपये प्रति महिना विद्या वेतन दिल्या जाणार आहे. जे कि त्यांच्या शिक्षणावर अवलंबून असेल. त्यानं विशेष प्रशिक्षणासाठी खाजगी कंपनी मध्ये अप्रेंटिसशिप ला देखील सहा महिने ठेवण्यात येणार आहे.
ज्याच्या माध्यमातून त्यांच्या हाताला स्किल मिडेल आणि ते स्वतः रोजगार निर्मण करू शकतील. अर्थात Vidya Vetan Yojana चा उद्देश्यच हे आहे कि, राज्यातील तरुणाईला रोजगार मिळण्यासाठी त्यांचा कौशल्य विकास करणे आणि रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवणे.
विद्या वेतन योजना महाराष्ट्र आर्थिक लाभ
Vidya Vetan Yojana Maharashtra मार्फ़त राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, त्यांच्या पात्रतेनुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील बेरोजगारी वर नियंत्रण आणण्यासाठी योजनेमार्फ़त खालील प्रमाणे लाभ देऊन रोजगार दिला जाणार आहे. ती खालील प्रमाणे बघुयात.
- जर पात्र अर्जदार हा बारावी पास असेल तर त्याला योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये प्रतिमाह दिले जाणार आहे.
- जर अर्जदार कोणताही फील्ड मध्ये डिप्लोमा धारक असेल तर त्याला 8,000 रुपये प्रति माह मिळतील.
- जर अर्जदार हा कुठल्याही शाखेचा पदवीधर असेल तर त्याला योजनेमार्फ़त प्रति माह 10,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे.
विद्या वेतन योजनाचे फायदे
- योजनेअंतर्गत महाराष्ट्र शाशन राज्यातील तरुणांना अगदी मोफत रोजगारप्राप्तीसाठी कौशल्य प्रशिक्षण देणार आहेत.
- या कौशल्य प्रशिक्षणामध्ये प्रतिमाह तरुणांना 6,000 ते 10,000/- रुपये प्रति महिना पर्यंत वेतन म्हणून आर्थिक मदत दिल्या जाणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- बेरोजगार तरुणांच्या हाताला काम लागेल आणि ते आपल्या कुटुंबाचे चांगल्या पद्धतीने पालन पोषण करू शकतील.
- योजनेमार्फ़त मिळणारी मदत लाभार्थीच्या डायरेक्ट खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा होणार आहे.
- मिळालेल्या रकमेतून कुटूंबाच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतील.
- लाभार्थी तरुणांचा सामाजिक दर्जा सुधारेल आणि त्याच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल.
- आतापर्यंत योजनेमार्फ़त हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळालेला आहे. आणि ते स्वतःच्या पायावर उभे झालेले आहेत.
विद्या वेतन योजनांसाठीच्या अटी आणि पात्रता
सरकारच्या विद्या वेतन योजनाचा (Vidya Vetan Yojana Maharashtra) लाभ घ्याचा असेल तर सरकारने अधिकृत रित्या आखून दिलेल्या अटी आणि पात्रता निकषांना पूर्ण करणे आवश्यक आहे. या निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुमचा अर्ज हा योजनेच्या लाभाकरिता पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे अतिशय बारकाईने ह्या पात्रता अटी बघाव्यात.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा तरुण हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्ज करणारा व्यक्ती हा बेरोजगार किंवा विध्यार्थी असणे देखील गरजेचे आहे.
- अर्जदाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी उत्तीर्ण असायला हवे.
- अर्जदारचे वय हे 18 पेक्षा कमी आणि 35 पेक्षा जास्त नसावे.
- पात्र लाभार्थ्यांचे भनक खाते हे मोबईल आणि आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
महत्वाचे बघा: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra
विद्या वेतन योजना महाराष्ट्रसाठी लागणारे कागदपत्रे
- आधारकार्ड
- रहिवासी दाखला
- पॅनकार्ड
- जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते पुस्तक
- शिक्षणाचा पुरावा
- मेल आयडी आणि मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
विद्या वेतन योजनांसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
- सर्वप्रथम Vidya Vetan Yojana Maharashtra साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले सर्व कागदपत्रे बनवून ठेवावे .
- नंतर योजनेच्या सरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत पोर्टल वर जायचे आहे.
- पोर्टल ला ओपन केल्यावर अप्लाय समोर “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” साठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लीक करा, तुमच्या पुढे योजनेचा अर्ज येईल.
- त्या अर्जात जी माहिती भरायची सांगितली ती ना भुलत आणि ना चुकता व्यवस्थित भरावी.
- अर्ज व्यवस्थित भरन झाल्यावर जी कागदपत्रे अपलोड करायला सांगितली ती व्यवस्थित अपलोड देखील करायची आहेत.
- अर्ज भरून आणि कागदपत्र अपलोड केल्यावर सबमिट नावाच्या बटनावर क्लीक करायचे आहे.
- अश्या सोप्या पद्धतीने विद्या वेतन योजना महाराष्ट्र किव्वा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांचा अर्ज ओनलाईन भरू शकता.
योजनेची अधिकृत वेब साइट | क्लिक करा |
निष्कर्ष
महाराष्ट्रातील तरुणांसाठीची अतिशय महत्वाची योजना Vidya Vetan Yojana Maharashtra आहे. जिच्या मुळेआज हजारो तरुणांना रोजगार प्राप्ती झाली आहे. सरकारने बेरोजगारी कमी करण्यासाठीचे एक चांगले पाऊल म्हणजे हि योजना असे सुद्धा मानायला काहीच हरकत नाही.
तुम्ही किव्वा तुमच्या आजूबाजूला जे बेरोजगार युवक असलीतलं त्यांच्या पर्यंत हि माहिती नक्की पोहोचवा. म्हणजे ते देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील. अर्ज करतांना काही अडचण आली असेल तर कंमेंट्स मध्ये सांगा, आमची टीम तुम्हाला नक्की मदत करेल.
FAQs
Que: विद्या वेतन योजना काय आहे?
Ans- विद्या वेतन योजनालाच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुद्धा म्हणटले जाते. या योजनांमार्फत बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपबंध करून दिल्या जाणार आहेत. सोबतच दहा हजार रुपया महिना पर्यंत पगार दिला जाणार आहे.
Que: विद्या वेतन योजनांसाठी कोण पात्र आहे?
Ans- राज्य सरकारने हि योजना राज्यातील युवकांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता युवक हा 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे. सोबतच इयत्ता बारावीचे शिक्षण सुद्धा आवश्यक आहेत.
Que: विद्या वेतन योजना कोणी सुरु केली आहे?
Ans- महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि योजना सुरु केली आहे.
Que: विद्या वेतन योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
Ans- योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवण्यासाठी सरकारचं अधिकृत साइट ला जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया हि आपल्या CMWaliYojana.Com या साइट ला सांगितलेली आहे. तिथे जाऊन एकदा संपूर्ण प्रकिया बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.